अमरावतीत स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन सेमिनार उत्साहात

ऑफिसर करियर अकॅडमीतर्फे आयोजन; गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार
अमरावतीत ऑफिसर करियर अकॅडमीतर्फे स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन सेमिनार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. वलगाव रोडवरील अल अजीज फंक्शन हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाला आमदार संजय खोडके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळावं, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
अमरावतीच्या वलगाव रोडवरील अल अजीज फंक्शन हॉलमध्ये ऑफिसर करियर अकॅडमीतर्फे स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन सेमिनार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं. अभ्यासाचं नियोजन, परीक्षेची तयारी आणि यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं.
यावेळी आमदार संजय खोडके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या प्रतिनिधी म्हणून मुश्ताक खान यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
तसंच नगरसेवक अनिल अग्रवाल, ॲडव्होकेट जिया खान, शान होंडाचे संचालक फिरोज खान, मेराज पठाण, एमआयएमचे नगरसेवक मुनजर अली, दिलबरशाह आणि याया पठाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात शिक्षकांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमध्येही या उपक्रमाबद्दल उत्साह पाहायला मिळाला.
दरम्यान, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशाचं कौतुक करत उपस्थित मान्यवरांनी इतर विद्यार्थ्यांनाही मेहनत, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून यश मिळवण्याचं आवाहन केलं.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला ऑफिसर करियर अकॅडमीचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मोफत मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी नवी ऊर्जा मिळाली.



