AmravaticitynewsLatest NewsMaharashtraWeather Report

बडनेऱ्यात पंधरा दिवसांनंतर पावसाची दमदार एन्ट्री

मुसळधार सरींनी उकाड्यापासून नागरिकांना दिलासा; काही सखल भागांत पाणी साचले

बडनेरा | प्रतिनिधी

गेल्या तब्बल पंधरा दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बडनेरा शहरात अखेर दमदार पावसाने हजेरी लावली. रविवारी दुपारी अचानक आलेल्या मुसळधार सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाच्या जोरदार सरींमुळे शहरातील काही सखल भाग आणि रस्त्यांवर काही काळ पाणी साचले.

पंधरा दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा

बडनेरा शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले होते. काही दिवसांपासून बंद असलेले कूलर पुन्हा सुरू करण्याची वेळ नागरिकांवर आली होती.

दरम्यान, रविवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास अचानक आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले आणि काही वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली.

जोरदार सरींमुळे वातावरणात गारवा

अचानक सुरू झालेल्या पावसामुळे काही वेळातच शहरातील वातावरण बदलले. जोरदार सरींमुळे हवेत गारवा निर्माण झाला आणि उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

मुसळधार पावसामुळे शहरातील काही सखल भाग तसेच रस्त्यांवर पाणी साचले. मात्र, पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस झाल्याने नागरिकांनी या पावसाचे उत्साहात स्वागत केले.

शेतकऱ्यांच्या नजरा पावसाच्या सातत्याकडे

पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र, पावसाचे सातत्य किती राहते आणि आगामी काळात पुरेसा पाऊस होतो का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या या दमदार पावसामुळे बडनेऱ्यात नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. आता पावसाचा जोर आणि सातत्य कायम राहते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button