BhivandicitynewsLatest NewsMaharashtraMaharashtra Politicspolitics

‘व्होट चोर’ वक्तव्यावर सुप्रिया सुळे मौन; भिवंडीत पत्रकारांच्या प्रश्नावर म्हणाल्या—आधी राहुल गांधींचं संपूर्ण भाषण ऐकणार

निवडणूक आयोगावरील आरोपांवर थेट प्रतिक्रिया टाळली; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भूमिकेबाबत चर्चांना उधाण

भिवंडी : राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या ‘व्होट चोर’ या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलं असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र या मुद्द्यावर थेट प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

भिवंडीत पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना राहुल गांधींच्या ‘व्होट चोर’ वक्तव्याबाबत प्रश्न विचारला. मात्र, त्यावर तातडीने भूमिका मांडण्याऐवजी राहुल गांधींचं संपूर्ण भाषण ऐकल्यानंतरच यावर बोलणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी सुप्रिया सुळे हसताना दिसल्या. तसेच चर्चेदरम्यान त्यांनी सहा तास मेहनत करू शकतात, असा सूचक उल्लेखही केल्याची माहिती आहे.

दरम्यान, बिहारमधील मतदार यादीत कथित घोळ असल्याचा आरोप करत राहुल गांधी सातत्याने निवडणूक आयोगावर निशाणा साधत आहेत. त्यांच्या या भूमिकेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही समर्थन दिल्याने हा मुद्दा सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

मात्र, महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर तात्काळ प्रतिक्रिया देण्याचं टाळल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची या मुद्द्यावर नेमकी भूमिका काय, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे, या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाड यांची भूमिका काय असणार, याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

राहुल गांधींच्या आरोपांवर विरोधक आक्रमक असताना, सुप्रिया सुळे यांनी थेट भूमिका न घेता संपूर्ण भाषण ऐकल्यानंतर बोलण्याची भूमिका घेतल्याने ‘व्होट चोर’च्या मुद्द्यावर महाविकास आघाडीत नेमका सूर काय राहणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button