भारतामध्ये लॉकडाऊनच्या अफवा खोट्या; केंद्र सरकारकडून स्पष्ट नकार

नवी दिल्ली :
पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत असताना केंद्र सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. लॉकडाऊनचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या अफवांना पूर्णपणे खोटं ठरवत, “भारत सरकारकडून लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नाही,” असे स्पष्टपणे सांगितले.
तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही या चर्चांना दुजोरा नाकारत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे देशात अनिश्चिततेचे वातावरण असले तरी सरकारकडून कोणताही लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.
एकूणच, सोशल मीडियावर पसरत असलेल्या लॉकडाऊनच्या अफवा निराधार असून नागरिकांनी केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.



