Amaravti Gramin

गो. से. महाविद्यालय, खामगाव येथे भव्य राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन

खामगाव येथे विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव द्वारा संचलित गो. से. विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय खामगाव येथे संस्थेचे माजी अध्यक्ष, खामगाव रत्न, माजी खासदार, ॲड. स्व. शंकररावजी बोबडे उपाख्य भाऊसाहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमाचा भाग म्हणून राज्यातील विद्यार्थ्यांच्या वैचारिक मंथनाला दिशा मिळावी व विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक जीवन उंचावण्यासाठी व्यासपीठ मिळावे. या उद्देशाने  राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरता भव्य राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा विषय “लोकशाहीमधील आंदोलने तारक की मारक’? असा आहे. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यभरातील महाविद्यालयातून दोन विद्यार्थी या स्पर्धेसाठी पाठवावे असे गो. से. महाविद्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा वैचारिक मेजवानी ठरणार आहे. भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. लोकशाही व्यवस्था जिवंत असण्याचा पुरावा म्हणजे लोकांच्या न्याय हक्कासाठी लोकांनीच केलेले आंदोलनं. परंतु आजच्या वर्तमान काळात आंदोलनाची  दिशा आणि स्थिती ‌बरलत असून. आंदोलने कशासाठी, कुणासाठी व कोणत्या उद्देशाने. इत्यादी बाबतीत महाविद्यालयीन तरुण विद्यार्थी, विचार कसे करतात हे जाणून घेण्याच्या हेतूने ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे. लोकशाहीचा आत्मा, आवाज म्हणजे आंदोलन असे समजले जाते. परंतु लोकशाही मधील आंदोलने आणि त्याची स्थिती पाहता या विषयाचे जागृत भान विद्यार्थ्यांना यावे या निर्मळ हेतूने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. आजचा युवक आंदोलनाबाबत कसा विचार करतो या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे विचार एकत्र मंचावर ऐकायला मिळतील.  वर्तमान विषयाच्या अनुषंगाने विचार मंथन व्हावे या उद्देशाने या भव्य राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाने केले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळतीलच सोबतच या स्पर्धेत अव्वल ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस रूपाने  रोख रक्कम मिळणार आहे. प्रथम क्रमांक ६०००/₹, द्वितीय क्रमांक ४०००/₹, तृतीय क्रमांक २०००/₹ आणि उत्तेजनार्थ बक्षीस दोन विद्यार्थ्यांना १०००/₹  बक्षीस देण्यात येईल. तरी या स्पर्धेत राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य धनंजय तळवणकर, जयंती उत्सव समितीचे समन्वयक डॉ. देवेंद्र व्यास व स्पर्धेचे समन्वयक प्रा. व्हि. यु. मोरे यांनी केले आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button