‘BJP लूट दिवस’; महागाईवाढीवर काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली – अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेल्या वाढीवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. बुधवारी (१ एप्रिल २०२६) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या दिवसाला ‘BJP लूट दिवस’ असे संबोधत सरकारवर निशाणा साधला.
खरगे म्हणाले की, सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना भाजप नेतृत्व “जनतेची लूट आणि देशाची लूट” करण्यातच गुंतले आहे. सध्याच्या संकटाच्या काळात सरकारने जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसने आरोप केला की, मोदी सरकारने देशाच्या धोरणात्मक आणि आर्थिक व्यवस्थेला मोठा फटका दिला असून, महागाई नियंत्रणात आणण्यात सरकार अपयशी ठरले आहे.
दरम्यान, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने घरगुती बजेट कोलमडत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



