citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

रामटेकमध्ये चप्पलच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; १८ वर्षीय समीर ध्रुवचा मृत्यू

रामटेक | प्रतिनिधी

रामटेक तालुक्यातील सोनेघाट परिसरात एका क्षुल्लक कारणावरून घडलेल्या वादाने भीषण रूप घेत १८ वर्षीय तरुणाचा बळी घेतला आहे. समीर ध्रुव (वय १८) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, Ram Navami च्या दिवशी मंदिराबाहेर ठेवलेल्या चपलांमधून चुकून एकाने दुसऱ्याची चप्पल घातल्याने वादाची ठिणगी पडली. सुरुवातीला किरकोळ असलेला हा वाद दुसऱ्या दिवशी अधिकच चिघळला.

५ एप्रिलच्या रात्री सोना ब्रिक्स वीट भट्ट्यावर हा वाद उफाळून आला. दारूच्या नशेत असलेल्या चार तरुणांनी समीर ध्रुव याच्यावर विटा आणि काठ्यांनी क्रूर हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

स्थानिकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, Ramtek पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या दोन तासांत चारही आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा समाजासमोर गंभीर प्रश्न उभा राहिला आहे—
अशा क्षुल्लक कारणांवरून होणाऱ्या हिंसाचाराला आळा कधी बसणार?

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button