Latest NewsMaharashtraWeather Report

ऐन दिवाळीच्या दिवशी राज्यात नांदेड, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यासह अनेक भागात पाऊसाचा फटका

ऐन दिवाळीच्या दिवशी राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. दिवाळीची खरेदी करण्याकरिता अनेक नागरिक बाहेर पडले होते. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. दिवसभर ऊन तापत होते आणि दुपारी चार वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.

आज राज्यातील अनेक भागात परतीचा जोरदार पाऊस झाला. नांदेड, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यासह अनेक भागात जोरदार पाऊस झाला. दिवाळी सणाच्या दिवशी जोरदार पाऊस झाल्याने बाजारपेठांमध्ये धावपळ उडाल्याचे पाहण्यास मिळाले. दरम्यान हवामान खात्याच्या वतीने आज नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने झोडपुन काढले आहे. सध्या जिल्ह्यात सोयाबीन काढणी सुरू आहे. अशात परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी परतीच्या पावासची हजेरी लावली असून परतीच्या पावसाचं सोयाबीन व कापसाला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाशिममध्ये दिवाळीची धामधूम तर शेत शिवारात सोयाबीन काढणीच्या हंगाम सुरू असताना वाशिममध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. वातावरणात बदल होत पावसाने दमदार हजेरी लावल्याने दिवाळीनिमित्त रस्त्यावर लावलेल्या दुकानदारांसह शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नांदेड शहरासह जिल्ह्यात आज परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ऐन दिवाळीच्या सणात परतीच्या पावसाने नांदेड जिल्ह्यातील अनेक भागाला झोडपले. आज हवामान खात्याकडून नांदेड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button