फेस्टिव सीझनमध्ये 2 लाख नोकऱ्यांची संधी! योग्य स्किल असणाऱ्यांना प्राधान्य

भारतात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या जास्त आहे. अनेकांना शिक्षण, कौशल्य असूनही चांगली नोकरी मिळत नाही. दरम्यान सणासुदीचा हंगाम त्यांच्यासाठी आनंदाचा ठरु शकतो. कारण हा हंगाम सुरू होताच भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळालीय. 2025 च्या सणासुदीच्या काळात सुमारे 2 लाख नवीन नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता असल्याचं एका ताज्या अहवालात म्हटलंय. यामुळे जॉब्स मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कोणत्या क्षेत्रांत होणार भरती?
या हंगामात नोकरभरतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 20-25 टक्के वाढ अपेक्षित आहे. किरकोळ विक्री, ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स आणि ग्राहक सेवा क्षेत्रात सर्वाधिक रोजगार संधी निर्माण होतील. विशेषतः क्विक कॉमर्स आणि थर्ड-पार्टी लॉजिस्टिक्स क्षेत्रात जलद डिलिव्हरी आणि पुरवठा साखळीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. यामुळे या क्षेत्रांत गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला चालना मिळत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
गिग वर्कचा वाढता प्रभाव
या सणासुदीच्या भरतीत गिग वर्कला विशेष महत्त्व आहे. एकूण नोकऱ्यांपैकी 70 टक्के नोकऱ्या तात्पुरत्या किंवा प्रोजेक्ट-आधारित असतील. कंपन्या आता फ्लेक्झिबल कार्यबल मॉडेल स्वीकारत असून खर्च कमी करत दीर्घकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी गिग वर्कला प्राधान्य देत आहेत. एनएलबी व्यवसाय आता उत्सवी भरतीला दीर्घकालीन धोरणाचा भाग मानतोय, असे सर्व्हिसेसचे सीईओ सचिन अलुग यांनी सांगितले.
सणासुदीनंतरही नोकऱ्या कायम
या हंगामातील काही नोकऱ्या तात्पुरत्या असल्या तरी अनेक कंपन्या सणासुदीनंतरही कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्याचा विचार करत आहेत. अहवालानुसार, ई-कॉमर्स आणि रिटेल कंपन्या 26 टक्के कर्मचाऱ्यांना वर्षभरासाठी ठेवण्याची योजना आखत आहेत. यामुळे कंपन्या वर्षभर मागणी पूर्ण करण्यासाठी मजबूत कार्यबल तयार करत असल्याचं अहवालात म्हटलंय.
टियर 2 आणि 3 शहरांचा उदय
महानगरांबरोबरच टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्येही रोजगाराच्या संधी वाढत आहेत. भुवनेश्वर, कोची, इंदूर, सुरत आणि नागपूर यांसारख्या शहरांमध्ये गिग वर्कमध्ये 30 ते 40 टक्के वाढ अपेक्षित आहे. ही शहरे सूक्ष्म-पूर्ती केंद्रे म्हणून विकसित होत असून, रिटेल आणि ई-कॉमर्स क्षेत्रात त्यांचा वाटा 50 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
किती नोकऱ्या तात्पुरत्या?
या नोकऱ्यांपैकी 70 टक्के नोकऱ्या तात्पुरत्या (गिग वर्क) स्वरूपाच्या असतील, तर 30 टक्के कायमस्वरूपी असतील. यामुळे कंपन्या लवचिक आणि खर्च-प्रभावी कर्मचारी मॉडेलकडे वळत असल्याचे दिसून आले आहे.
सणासुदीच्या हंगामात किती नवीन नोकऱ्या निर्माण होणार आहेत आणि त्यांचे स्वरूप कसे असेल?
२०२५ च्या सणासुदीच्या काळात सुमारे २ लाख नवीन नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. यापैकी ७० टक्के नोकऱ्या तात्पुरत्या किंवा गिग वर्क स्वरूपाच्या असतील, तर ३० टक्के कायमस्वरूपी असतील. हे कंपन्यांच्या लवचिक कार्यबल मॉडेलकडे दर्शवते.
कोणत्या क्षेत्रांत सर्वाधिक रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत?
सणासुदीच्या हंगामात किरकोळ विक्री, ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स आणि ग्राहक सेवा क्षेत्रांत मोठी भरती होईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत २०-२५ टक्के वाढ अपेक्षित असून, क्विक कॉमर्स आणि थर्ड-पार्टी लॉजिस्टिक्स क्षेत्रांत जलद डिलिव्हरी आणि पुरवठा साखळीच्या गरजांमुळे सर्वाधिक संधी असतील.
सणासुदीच्या हंगामानंतर या नोकऱ्या कायम राहतील का?
होय, अनेक कंपन्या सणासुदीनंतरही कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्याची योजना आखत आहेत. अहवालानुसार, ई-कॉमर्स आणि रिटेल कंपन्या २६ टक्के कर्मचाऱ्यांना वर्षभरासाठी ठेवतील, ज्यामुळे वर्षभर मागणी पूर्ण करण्यासाठी मजबूत कार्यबल तयार होईल.



