अमरावतीच्या मध्यवर्ती भागात अस्वच्छतेचं साम्राज्य! जयस्तंभ चौकातील गुलशन टॉवर परिसर कचऱ्याच्या विळख्यात

अमरावती शहराचा हृदयस्थानी मानला जाणारा जयस्तंभ चौक आणि त्याच ठिकाणी असलेला गजबजलेला गुलशन टॉवर परिसर सध्या अस्वच्छतेच्या गंभीर समस्येला सामोरे जात आहे. हजारो नागरिकांची रोजची वर्दळ असलेल्या या भागात कचऱ्याचे ढिग आणि अस्वच्छतेचे चित्र पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात ३ ते ४ बँका, ४ ते ५ कोचिंग क्लासेस आणि तब्बल ३०० पेक्षा अधिक दुकाने कार्यरत आहेत. मात्र, इतक्या महत्त्वाच्या ठिकाणीही मूलभूत स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
👉 नाल्यांची अनेक महिन्यांपासून साफसफाई नाही
👉 सफाई कर्मचाऱ्यांचा नियमित फेरा नाही
👉 महापालिकेची घंटागाडीही परिसरात दिसत नाही
यामुळे कचरा रस्त्यावर साचत असून दुर्गंधी पसरत आहे. त्यातच परिसरातील वाईन शॉपमुळे रात्रीच्या वेळी काहीजण सार्वजनिक ठिकाणी बसून दारू पित असल्याने व्यापारी आणि रहिवाशांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिकांनी अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या असल्या, तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
सर्वात मोठा प्रश्न आता उभा राहतो —
👉 शहराच्या मध्यवर्ती भागाचीच अशी अवस्था असेल, तर इतर भागांची स्थिती काय असेल?
अमरावती महापालिका प्रशासन या गंभीर समस्येकडे लक्ष देणार का, की नागरिकांना असाच त्रास सहन करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📺 अशाच स्थानिक घडामोडींसाठी पाहत राहा — सिटी न्यूज



