राघव चड्ढा यांची राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे धाव; AAP सोडून भाजपात गेलेल्या खासदारांना त्रास दिल्याचा आरोप

राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांनी मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत आम आदमी पक्ष (AAP) सोडून भाजपात दाखल झालेल्या माजी खासदारांना राजकीय सूडातून त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
राघव चड्ढा यांनी आरोप केला की, AAP सोडून भाजपात विलीन झालेल्या काही माजी खासदारांवर राज्य यंत्रणांच्या माध्यमातून दबाव, धमक्या आणि छळ केला जात आहे. पंजाबमधील AAP सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असून राज्य यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
मंगळवारी राघव चड्ढा यांनी आणखी तीन खासदारांसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रपतींकडे निवेदन सादर करत, AAP सोडल्यानंतर आपल्यावर आणि इतर खासदारांवर राजकीय हेतूने कारवाया केल्या जात असल्याचा दावा केला.
चड्ढा यांनी पंजाबमधील AAP सरकारवर “वेंडेटा पॉलिटिक्स” म्हणजेच सूडाच्या राजकारणाचा आरोप करत, विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याचे म्हटले आहे.
AAP सोडून भाजपात गेलेल्या खासदारांवर सुरू असलेल्या कारवाया या राजकीय प्रेरित असून, लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचेही त्यांनी राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनात नमूद केले.
या घडामोडींमुळे पंजाबच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण तापले असून, AAP आणि भाजप यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



