citynewsLatest NewsMaharashtra

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण ‘डेड एंड’मध्ये; उच्च न्यायालयाची NIAवर ताशेरे, चार आरोपी निर्दोष मुक्त

मुंबई : २००६ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत हे प्रकरण “डेड एंड”मध्ये पोहोचल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने चार आरोपींना निर्दोष मुक्त करताना राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) वर गंभीर ताशेरे ओढले आहेत.

मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती श्याम चंदक यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशात नमूद केले की, आधीच्या तपास यंत्रणेकडून जमा करण्यात आलेल्या पुराव्यांकडे NIA ने “पूर्णपणे दुर्लक्ष” केले. तसेच, NIA ने स्वामी असीमानंद यांच्या नंतर मागे घेतलेल्या कबुलीजबाबावर आधारित नवे कथानक उभे केले, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

या स्फोटांमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, न्यायालयाच्या या निर्णयानंतर या भीषण घटनेमागे नेमके कोण जबाबदार होते, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच राहिला आहे.

या प्रकरणातील न्यायालयीन निरीक्षणांमुळे तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या संवेदनशील प्रकरणात पुढे काय घडामोडी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button