Crime NewsIndia NewsLatest News

सहारनपूरमध्ये तीन महिला तस्कर अटकेत; ५० लाखांची अफू जप्त

सहारनपूर (प्रतिनिधी): सहारनपूर येथे अमली पदार्थांविरोधातील कारवाईत पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. तीन महिला तस्करांना अटक करत त्यांच्या ताब्यातून सुमारे पाच किलो अफू जप्त करण्यात आली असून, जप्त मालाची बाजारातील किंमत अंदाजे ५० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

ही कारवाई उत्तर प्रदेश पुलिस मादक पदार्थ रोधी कार्य बल (एएनटीएफ)च्या मेरठ युनिट आणि स्थानिक सदर बाजार थाना पुलिस यांच्या संयुक्त पथकाने रविवारी केली.

पोलिस अधीक्षक (शहर) व्योम बिंदल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुखबिराकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर गंगोह बसस्थानकाजवळ सापळा रचण्यात आला. त्यावेळी तस्करीमध्ये सहभागी असलेल्या तीन महिलांना अटक करण्यात आली.

अटकेत घेतलेल्या महिलांमध्ये नेपाळमधील जयमती कुमारी देवी आणि हसन तारा खातून तसेच बिहार राज्यातील बेतिया येथील रुखसाना खातून यांचा समावेश आहे. तिघींच्या ताब्यातून ५ किलो ९९ ग्रॅम अवैध अफू जप्त करण्यात आली.

पोलिसांनी तिन्ही आरोपी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button