AmravatiLatest NewsMaharashtra Politicspolitics

ज्येष्ठ पत्रकार अनिल अग्रवाल झाले नगरसेवक

वैदर्भीय पत्रकारितेला नवे आयाम देणाऱ्या नेतृत्वाची राजकारणात एन्ट्री

अमरावती : वैदर्भीय पत्रकारितेत गेली तीन दशके विश्वासार्ह आणि निर्भीड कामगिरी करणारे ज्येष्ठ पत्रकार अनिल अग्रवाल यांनी आता राजकारणात प्रभावी पाऊल टाकत नगरसेवक पदाची शपथ घेतली आहे. पत्रकारितेतून समाजकारण आणि आता थेट लोकसेवेच्या राजकारणात प्रवेश करत त्यांनी नवी जबाबदारी स्वीकारली आहे.

३० वर्षांची विश्वासार्ह पत्रकारिता आता लोकसेवेसाठी

सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय राहून अनिल अग्रवाल यांनी समाजातील विविध प्रश्नांवर आवाज उठवला. निर्भीड लेखन, तळागाळातील प्रश्नांवर सातत्याने प्रकाश टाकणे आणि पत्रकारांच्या हक्कांसाठी लढा देणे यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. आता हीच भूमिका ते नगरविकासाच्या माध्यमातून पार पाडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अमरावती मंडलचे संपादक म्हणून प्रभावी कार्य

अमरावती मंडल या वृत्तपत्राचे संपादक म्हणून त्यांनी पत्रकारितेत नवे मानदंड प्रस्थापित केले. वैदर्भीय पत्रकारितेला नवे आयाम देताना अनेक सामाजिक विषयांवर व्यापक जनजागृती घडवून आणली.

पत्रकार भवन उभारणारे नेतृत्व

पत्रकारांच्या एकात्मतेसाठी आणि संघटनात्मक बळकटीसाठी त्यांनी पत्रकार भवन उभारणीसाठी पुढाकार घेतला. पत्रकारांच्या प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडत त्यांनी संघटनात्मक चळवळींना दिशा दिली.

प्रेस परिषदेचे माजी सदस्य

प्रेस परिषद चे माजी सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. पत्रकारिता क्षेत्रातील आचारसंहिता, स्वातंत्र्य आणि जबाबदारी याबाबत त्यांनी प्रभावी भूमिका बजावली.

पत्रकार सुरक्षा कायद्याचा पाठपुरावा

पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटनांनंतर पत्रकार सुरक्षा कायद्याची मागणी सातत्याने लावून धरत त्यांनी राज्यस्तरावर पाठपुरावा केला. कोरोना काळात पत्रकारांना ‘फ्रंटलाईन वॉरिअर’चा दर्जा मिळावा यासाठीही त्यांनी लढा दिला होता.

समाजकारणातून राजकारणात प्रभावी पाऊल

सामाजिक बांधिलकी जपत आता नगरसेवक म्हणून शहराच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. स्वच्छता, पायाभूत सुविधा, पत्रकार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विकासाच्या नव्या पर्वासाठी विश्वास

अनिल अग्रवाल यांच्या निवडीमुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. पत्रकारितेतील अनुभव आणि सामाजिक जाणीव यांच्या बळावर ते नगरविकासातही प्रभावी कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button