इराणमध्ये तणाव शिगेला! भारत सरकारची नागरिकांना तातडीची सूचना — “घरातच थांबा किंवा लवकरात लवकर बाहेर पडा”

मध्यपूर्वेत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची अॅडव्हायजरी जारी केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) नागरिकांना “तातडीने इराण सोडावे” किंवा “सुरक्षित ठिकाणी घरातच थांबावे” असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
तेहरानमधील भारतीय दूतावासाने परिस्थिती झपाट्याने बिघडत असल्याचे सांगत नागरिकांना कोणताही अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच पुढील ४८ तास अत्यंत सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
🔴 महत्त्वाच्या सूचना:
- इराणमध्ये अनावश्यक प्रवास पूर्णपणे टाळावा
- सध्या इराणमध्ये असलेल्यांनी सुरक्षित ठिकाणी घरातच थांबावे
- आंदोलन, निदर्शने किंवा गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहावे
- दूतावासाशी संपर्क न करता कोणतीही भूसीमा (Land Border) ओलांडू नये
- सर्व भारतीय नागरिकांनी तेहरानमधील भारतीय दूतावासात नोंदणी करावी
- स्थानिक बातम्या आणि दूतावासाच्या अधिकृत सोशल मीडिया अपडेट्सवर लक्ष ठेवावे
दरम्यान, मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा देत “आज रात्री संपूर्ण सभ्यता नष्ट होईल” असे वक्तव्य केले आहे. त्यावर इराणनेही प्रत्युत्तर देत “तुम्हाला आणि तुमच्या मित्रराष्ट्रांना विसरता न येणारा फटका बसणार” असा इशारा दिला आहे.
याचदरम्यान, अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील खार्ग आयलंडसह काही महत्त्वाच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या संघर्षाचे मोठ्या युद्धात रूपांतर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
📺 ताज्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसाठी पाहत राहा — सिटी न्यूज



