Latest NewsMaharashtra

“अलिशान मुंबई घर, मंत्रीपद आणि … दुबे ठरणार काय भाषेचा दुबळा?”

मुंबई: महाराष्ट्राकडे स्वत:चं काय आहे? महाराष्ट्र इतरांच्या भाकरीवर जगतो. महाराष्ट्राकडे स्वत:कडे स्वत:चे उद्योगधंदे, खाणी नाहीत. इतर राज्यांमधील उद्योजकांच्या जीवावर महाराष्ट्र चालतो, अशा आशयाची विधानं करुन महाराष्ट्रद्वेष दाखवून देणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे मुंबईकर निघाले आहेत. महाराष्ट्रात काय आहे, असं विचारणाऱ्या दुबे यांचा मुंबईतील उच्चभ्रू भागात आलिशान फ्लॅट आहे. महाराष्ट्रात उद्योगधंदे नाहीत, असं म्हणणारे दुबे जवळपास दीड दशक मुंबईतच कामाला होते, अशी माहिती समोर आलेली आहे. या माहितीमुळे दुबे अक्षरश: तोंडावर पडले आहेत.

मुंबईच्या पश्चिम उपगनगरात असलेल्या खारमध्ये भाजप खासदार निशिकांत दुबे यांचा आलिशान फ्लॅट आहे. दुबे झारखंडच्या गोड्डा मतदारसंघाचे आमदार आहेत. पण त्यांच्या मालकीचा फ्लॅट मुंबईत आहे. खार पश्चिमेला असलेल्या १६ व्या क्रमांकाच्या रस्त्यावर असलेल्या झुलेलाल अपार्टमेंटमध्ये दुबे यांच्या मालकीचा फ्लॅट आहे. या फ्लॅटचा क्रमांक ४०४ आहे. त्याचं क्षेत्रफळ १६८० चौरस फूट इतकं आहे.

दुबे यांच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये सध्या एक भाडेकरु वास्तव्यास आहेत. गेल्या १० ते १२ वर्षांपासून निशिकांत दुबे यांच्या फ्लॅटमध्ये एकच भाडेकरु राहत आहे. बऱ्याच कालावधीपासून दुबे यांच्याशी बोलणं झालं नसल्याचं या भाडेकरुनं सांगितलं. फ्लॅट खासदार दुबे यांचाच असल्याची माहितीदेखील दुबे यांनी दिली आहे. १० ते १२ वर्षांपूर्वी या फ्लॅटमधील भाडेकरु सतत बदलायचे. पण गेल्या १० ते १२ वर्षांपासून इथे एकच भाडेकरु वास्तव्यास आहे.

२००९ मध्ये निशिकांत दुबे भाजपच्या तिकिटावर लोकसभेचे खासदार झाले. त्यावेळी त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात खारमधील फ्लॅटचा तपशील दिला होता. तेव्हा या फ्लॅटची किंमत १ कोटी ६० लाख रुपये होती. महाराष्ट्रात काय आहे, असं विचारणाऱ्या दुबे यांना मुंबईत घर घेण्याचा मोह आवरता आलेला नाही

महाराष्ट्रात उद्योगधंदे नाहीत असं म्हणणारे दुबे १९९३ ते २००९ अशी १६ वर्षे मुंबईतील एका बड्या कॉर्पोरेट कंपनीत काम करत होते. स्टील, ऊर्जा क्षेत्रातील एका मोठ्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळावर कार्यरत होते. तब्बल दीड दशक दुबे यांनी मुंबईतील कंपनीत उच्च पदावर काम केलं आहे. मुंबईत नोकरी करुन, इथेच फ्लॅट विकत घेणाऱ्या दुबेंनी महाराष्ट्रात काय आहे, असा सवाल केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. ज्या महाराष्ट्रानं दुबेंना रोटी दिली, त्याच महाराष्ट्राला दूषणं देणं म्हणजे कृतघ्नपणा असल्याच्या भावना जनमानसातून व्यक्त होत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button