पाचव्या टी-२० सामन्यात दोन हुकमी एक्क्यांना विश्रांती, टीममध्ये कोणाची होणार एन्ट्री ?

मुंबई :- टीम इंडिया आणिा इंग्लंडमध्ये अखेरचा पाचवा टी-२० सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर पार पडणार आहे. पुण्यात झालेला चौथा टी-२० सामना जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. मालिका गमावल्यानंतर पाहुणा इंग्लंड संघ पाचवा टी-२० सामना जिंकत गोड शेवट करण्याचा प्रयत्न करेल, मात्र टीम इंडियाचे सहजासहज विजय मिळवून देणार नाहीत. राजकोटमध्ये झालेला सामना वगळता तिन्ही सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. आजच्या सामन्यामध्ये महत्त्वाच्या खेळाडूंनी विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे पाचव्या टी-२० मध्ये प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतो.
पाचव्या सामन्यामध्ये अर्शदीप सिंह याला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी स्टार बॉलर मोहम्मद शमी याला संधी दिली जाऊ शकते. या मालिकेतील एका सामन्यात शमीला संधी मिळाली होती मात्र त्या सामन्यात चमकदार कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे टीम मॅनेजमेंट त्याला आणखी एक संधी देऊ शकतं. दुसरा खेळाडू हार्दिक पंड्या यालाही विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी रमनदीप सिंह याला टीममध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यासोबतच पुन्हा एकदा ध्रुव जुरेलला टीममध्ये घेतलं जाण्याची शक्यता आहे.
टीम इंडियासाठी संपूर्ण मालिकेमध्ये हार्दिक पंड्या मॅचविनर खेळाडू राहिला आहे. राजकोटच्या सामन्यामध्येही सर्व फलंदाज अपयशी ठरले त्यावेळी पंड्या एकटा मैदानावर टिकून होता. समोरून त्यासा हवी तशी साथ मिळाली नाही. जर राजकोटच्या सामन्यामध्ये हार्दिक पंड्या शेवटच्या बॉलपर्यंत मैदानावर असता तर कदाचित सामन्याचा निकाल काही वेगळा असता. मात्र पंड्या आऊट झाल्याने तो सामना टीम इंडियाने गमावला.
दरम्यान, पाचव्या सामन्यामध्ये हर्षित राणा आणि शिवम दुबे यांनाही टीममध्ये जागा भेटू शकते. दुबेने आपली ताकद सर्वांना दाखवून दिली. चौथ्या सामन्यात पठ्ठ्याने दमदार अर्धशतकी खेळी केली होती. संध्याकाळी ७.३० मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल.
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यासाठी टीम इंडियाचा संभाव्य प्लेइंग 11- अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षित राणा, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.



