amravatiAmravati Gramincitynews
वर्ध्यापासून चांदूर बाजारपर्यंत वाघीण ‘पिंकी’ची दहशत! रेस्क्यू ऑपरेशनमध्ये गंभीर सवाल

वाघीण पिंकीचा रेस्क्यू; बेशुद्ध केल्यानंतर पुन्हा का केले ट्रँक्विलाइज? उठले गंभीर सवाल

वर्ध्यापासून चांदूर बाजारपर्यंत नरभक्षक वाघीण पिंकीच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर चांदूर बाजार परिसरात वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवत वाघीण पिंकीला ट्रँक्विलाइज करून बेशुद्ध केले. मात्र, वाघीण आधीच बेशुद्ध झाल्यानंतर तिला पुन्हा ट्रँक्विलाइज का करण्यात आले, असा सवाल आता उपस्थित होत आहे. रेस्क्यू ऑपरेशनच्या प्रक्रियेबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले असून, दुसऱ्यांदा ट्रँक्विलाइज करण्याची नेमकी गरज काय होती, याचे कारण स्पष्ट होणे गरजेचे आहे. पिंकीच्या रेस्क्यू ऑपरेशनची संपूर्ण प्रक्रिया आणि त्यामागील महत्त्वाची माहिती जाणून घेऊया



