Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsEducation NewsMaharashtra

अमरावतीत स्वच्छतेचा प्रश्न गंभीर; प्रभाग क्रमांक ६ मध्ये कचऱ्याचे साम्राज्य, शिवसेनेचा महानगरपालिकेला इशारा

अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मोरबाग, विलासनगर, गवळीपुरा, मसानगंज, झाडपीपुरा, चेतनदास बगीचा, बजरंग टेकडी आणि इतवारा बाजार परिसरातील सफाई कामगारांनी अचानक बंद पुकारल्याने अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते पंजाबराव तायवडे आणि माजी महापौर संजय नरवणे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


ही परिस्थिती अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील विविध भागात समोर आली आहे. मोरबाग, विलासनगर, गवळीपुरा, मसानगंज, झाडपीपुरा, चेतनदास बगीचा, बजरंग टेकडी आणि इतवारा बाजार या भागातील सफाई कामगारांनी आघोषित बंद पुकारल्यामुळे सकाळी आठ वाजेपर्यंत स्वच्छतेची कामे सुरूच झाली नाहीत.

यामुळे अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून नाल्यांमधून दुर्गंधी पसरली आहे. काही ठिकाणी नाल्यांतील घाण आणि किडे नागरिकांच्या घरांमध्ये जात असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते पंजाबराव तायवडे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. अधिकारी नगरसेवकांचे फोन उचलत नाहीत आणि प्रत्यक्ष पाहणीही करत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच माजी महापौर व विद्यमान नगरसेवक संजय नरवणे यांनी सांगितले की, परिसरात स्वच्छता होत नसल्यामुळे नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे आणि मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेचा ठेका ज्या कंपनीला देण्यात आला आहे, त्या कंपनीकडे आवश्यक साधनसामुग्री नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

जर संबंधित कंपनीने तातडीने काम सुरू केले नाही तर त्या कंपनीवर दंडात्मक कारवाई करून काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, इतवारा बाजार परिसरातील मशिदीसमोर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचेही समोर आले आहे. तसेच पिंजरा गल्ली परिसरात नाल्यांमधून दुर्गंधी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.


स्वच्छतेच्या या गंभीर प्रश्नामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने महानगरपालिकेला टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन या समस्येवर कितपत लवकर उपाययोजना करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button