दिवाळीपूर्वी RBI चा मोठा निर्णय येण्याची शक्यता, सामान्यांसाठी दिलासादायक बातमी!

2025 हे वर्ष सामान्यांसाठी दिलासादायी ठरलंय. केंद्र सरकारने वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्नावर करमुक्ती जाहीर केली, तर आरबीआयने फेब्रुवारी, एप्रिल व जूनच्या धोरण बैठकींमध्ये रेपो दरात सलग कपात करून कर्जे स्वस्त केली. यानंतर जीएसटी परिषदेने अप्रत्यक्ष करांमध्ये मोठे बदल करून घरगुती वस्तूंच्या किंमती घसरवल्या. आता आरबीआय सर्वसामान्यांना ‘दिवाळी भेट’ देण्याच्या तयारीत आहे. यामुळे सर्वसामान्यांना कसा दिलासा मिळणार आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
1 ऑक्टोबरला होणाऱ्या चलनधोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत व्याजदर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यामुळे गृहकर्जांच्या मासिक हप्त्यांवर (ईएमआय) फायदा होऊ शकतो. आरबीआय दर स्थिर ठेवेल, असे तज्ज्ञ सांगतात. रॉयटर्सच्या ताज्या सर्वेक्षणात याबद्दल माहिती देण्यात आलीय.
रॉयटर्स पोलचा अंदाज काय सांगतो?
रॉयटर्सच्या 24 सप्टेंबरच्या सर्वेक्षणात 61 पैकी 45 अर्थतज्ज्ञांनी ऑक्टोबर व डिसेंबरच्या बैठकीत रेपो दर 5.50 टक्क्यांवर अपरिवर्तित राहण्याचा अंदाज वर्तवला. उर्वरित 16 जणांनी 25 बेसिस पॉइंट कपातीची शक्यता सांगितली. आरबीआय मागील कपातींचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम तपासत असल्याचे कारण यामागे देण्यात येतंय.
अर्थव्यवस्थेची स्थिती कशी आहे?
गेल्या तिमाहीत भारताची जीडीपी वाढ 7.8 टक्क्यांवर पोहोचली, जी अपेक्षेपेक्षा जास्त आहे. सरकारी खर्चामुळे ही वाढ झाली असली तरी खासगी गुंतवणूक कमी झाल्याचेही रिपोर्टमध्ये म्हटलंय.. नोव्हेंबरपासून चलनवाढ 2 ते 6 टक्के अटकेत राहिली तरी रुपया डॉलरसमोर कमकुवत होतोय ज्यामुळे आयाती महागाई वाढताना दिसतेय.
जागतिक आव्हाने काय आहेत?
अमेरिकेतील व्यापारी तणाव व नवीन व्हिसा नियमांमुळे बाजारात अनिश्चितता आहे. यामुळे रुपया नीचांकी पातळीवर घसरला, गुंतवणूकदार शेअर बाजारातून बाहेर पडले. आरबीआयची ऑगस्टची बैठक एकमताने दर स्थिर ठेवली, हीच धोरण पद्धत कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तज्ज्ञ काय सांगतायत?
“दर कपात होणार नाही, कारण खासगी गुंतवणूक वाढली नाहीय, असे कॅनरा बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ माधवनकुट्टी यांनी म्हटलंय. वेतनवाढ स्थिर व नोकरी चिंता कायम असल्याचेही ते म्हणआले. 50 पैकी 26 तज्ज्ञांनी 2025 अखेरपर्यंत दर न बदलण्याचा अंदाज वर्तवलाय. यापूर्वी डिसेंबर कपातीची अपेक्षा होती.
जनतेवर काय होईल परिणाम?
व्याजदर स्थिर राहिले तर ईएमआयवर दिलासा मिळणार नाही पण अर्थव्यवस्थेला स्थिरता लाभेल. आरबीआय विकासाला चालना देण्यासाठी सतर्क असल्याचे तज्ञ सांगतात. आता 1 ऑक्टोबरला आरबीआय काय निर्णय घेणार? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
१. आरबीआय १ ऑक्टोबर 2025 रोजी व्याजदर कमी करेल का?
रॉयटर्सच्या 24 सप्टेंबरच्या सर्वेक्षणानुसार, 61 पैकी 45 अर्थतज्ज्ञांनी (सुमारे 75%) अंदाज वर्तवला आहे की आरबीआय रेपो दर 5.50 टक्क्यांवर कायम ठेवेल. फक्त 16 तज्ज्ञांनी 25 बेसिस पॉइंट कपातीची शक्यता सांगितली. म्हणून, व्याजदर कमी होण्याची शक्यता कमी आहे, कारण आरबीआय मागील कपातींचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम तपासत आहे.
२. व्याजदर स्थिर राहिल्यास सामान्य लोकांवर काय परिणाम होईल?
व्याजदर 5.50 टक्क्यांवर स्थिर राहिल्यास गृहकर्ज किंवा इतर कर्जांचे मासिक हप्ते (ईएमआय) कमी होणार नाहीत. यामुळे कर्ज स्वस्त होण्याची अपेक्षा असलेल्या सामान्यांना तूर्तास दिलासा मिळणार नाही. तथापि, अर्थव्यवस्थेला स्थिरता मिळेल, कारण आरबीआय सावध धोरण अवलंबत आहे.
३. आरबीआय व्याजदर का बदलत नाही?
आरबीआय व्याजदर स्थिर ठेवण्याची शक्यता आहे कारण अर्थव्यवस्था 7.8 टक्के दराने वाढत आहे, पण खाजगी गुंतवणूक कमी झाली आहे. रुपया कमकुवत होऊन आयात महाग झाली आहे, आणि अमेरिकेतील व्यापारी तणाव व व्हिसा नियमांमुळे जागतिक अनिश्चितता वाढली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की खाजगी गुंतवणूक आणि वेतनवाढ अद्याप स्थिर आहे, त्यामुळे आरबीआय सतर्क धोरण ठेवत आहे.



