Latest News

“कोण बोललं?” सूर्यकुमार यादवच्या उत्तराने पत्रकार परिषदेत शांतता; पाकिस्तानचा कर्णधारही झाला अवाक!

2025 Asia Cup : आशिया कप स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. त्याआधी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा यांच्यासह सर्व 6 संघाच्या कर्णधारांनी पत्रकार परिषदेला हजेरी लावली. या स्पर्धेत भारतीय संघ सर्वांचा फेव्हरेट संघ आहे. भारताने नुकताच टी-20 वर्ल्डकप जिंकला असल्यानेही भारतीय संघाकडून सर्वाधिक अपेक्षा आहेत. पण पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव आणि सलमान यांना जेव्हा भारतीय संघ सर्वांचा फेव्हरेट असल्याचं विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सर्वांना आश्चर्यकारक उत्तर दिलं. सूर्यकुमार यादवने तर ‘तुम्हाला कोणी सांगितलं?’ असा प्रश्न विचारत

“कोणी सांगितलं? मी तर नाही ऐकलं (Who said? I didn’t hear it) जर तुमची तयारी उत्तम असेल तर तुम्ही मैदानावर उतरता तेव्हा नक्कीच आत्मविश्वास असतो. हो, आम्ही बऱ्याच काळानंतर खेळत आहोत पण आम्ही 3-4 दिवसांपूर्वी इथे होतो. आम्ही एकत्र एक संघ म्हणून चांगला वेळ घालवला. या स्पर्धेसाठी आम्ही फार उत्सुक आहोत,” असं सूर्यकुमार यादवने पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं.

जेव्हा पाकिस्तानचा कर्णधार सलमानला याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला की, “खेळाच्या स्वरूपामुळे कोणताही संघ टी-20 मध्ये असा आवडता नसतो”.

“टी-20 क्रिकेटमध्ये, मला वाटत नाही की कोणताही संघ फेव्हरेट असतो. विशिष्ट दिवशी, तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागतं. हा एक वेगवान खेळ आहे. काही ओव्हर्सनी खेळ खेळ बदलू शकतो,” असं सलमान म्हणाला.

पाकिस्तानने अलीकडेच युएई आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिरंगी मालिकेत भाग घेतला होता जिथे त्यांनी विजय मिळवला. मालिकेपूर्वी, सलमान म्हणाला होता की जर पाकिस्तान आशिया कप जिंकला नाही तर तिरंगी मालिका जिंकण्याचा काही अर्थ राहणार नाही. जेव्हा एका पत्रकाराने त्याच्या या टिप्पण्यांबद्दल विचारले तेव्हा सलमान म्हणाला की, “आशिया कपसाठी अफगाणिस्तान आणि यूएई विरुद्धची तिरंगी मालिका नेहमीच तयारीप्रमाणे असतं. आम्हाला ती स्पर्धा जिंकायची होती. जर आम्ही ती जिंकली नसती, तर आम्हाला इथे येऊन आशिया कप जिंकायचा होता.”

1) २०२५ च्या एशिया कपचे तारखा आणि ठिकाण काय?
स्पर्धा ९ सप्टेंबर २०२५ रोजी सुरू होईल आणि २८ सप्टेंबरला अंतिम सामना होईल. एकूण १९ सामने खेळली जातील. ठिकाण: संयुक्त अरब अमिराती (UAE). दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये ११ सामने (अंतिम सामनासह) आणि शेख जायद क्रिकेट स्टेडियम (अबू धबी) मध्ये ८ सामने. मूळतः भारतात होणार होती, पण भारत-पाकिस्तान तणावामुळे UAE ला हस्तांतरित.

2) सहभागी संघ कोणते?
८ संघ: ग्रुप A: भारत, पाकिस्तान, युनायटेड अरब अमिराती (UAE), ओमान.
ग्रुप B: अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, हाँगकाँग.
ACC चे ५ कायमस्वरूपी सदस्य (भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान) आणि २०२४ प्रीमियर कप विजेते (UAE, ओमान, हाँगकाँग) सहभागी.

3) भारत-पाकिस्तान सामना कधी?
ग्रुप A मध्ये १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये. सुपर फोरमध्ये (२१ सप्टेंबर) आणि अंतिम सामन्यात (२८ सप्टेंबर) पुन्हा भेट शक्य. हे सामने स्पर्धेची हायलाइट असतील.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button