India NewsLatest NewsWeather Report

ओडिशामध्ये भीषण वादळाचा कहर; २ ठार, २०० हून अधिक घरे उद्ध्वस्त

ओडिशा राज्यातील मयूरभंज जिल्हा येथे रविवारी आलेल्या भीषण वादळाने (नॉर्वेस्टर) मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. या नैसर्गिक आपत्तीत दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या वादळामुळे १२ गावांतील २०० हून अधिक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडे आणि वीज खांब उन्मळून पडले.

कांकरा गावातील एका नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की एक ऑटो रिक्षा आणि एक स्कूटर हवेत उडून जवळच्या पाण्याच्या स्त्रोतामध्ये जाऊन पडले. या दुर्घटनेत पी. नायक (५४) आणि मालती महंता (४५) यांचा मृत्यू झाला असून ते नॅशनल हायवे-220 जवळ वादळात अडकले होते.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमी झालेल्या पाच जणांना क्योंझर मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर सुमारे ४० जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.

सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभाग (IMD) ने मयूरभंज जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज वॉर्निंग’ जारी केली असून, सुंदरगड, क्योंझर, बालासोर आणि भद्रक जिल्ह्यांसाठी ‘येलो वॉर्निंग’ देण्यात आली आहे.

प्रशासनाने नागरिकांना खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button