Latest News

यवतमाळमध्ये ओबीसी हक्कांसाठी ‘मंडल यात्रा’ दाखल: राजा राजपूरकर यांचा भाजपवर हल्लाबोल

यवतमाळ, सिटी न्यूज: महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आणि जातीनिहाय जनगणनेसाठी सुरू असलेली मंडल यात्रा यवतमाळमध्ये दाखल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी राज्याध्यक्ष राजा राजपूरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन यात्रेच्या मागण्या स्पष्ट केल्या आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

राजपूरकर यांनी सांगितले की, तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्यामुळेच मंडल आयोगाची अंमलबजावणी होऊन ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळाले. त्यांनी आरोप केला की, भाजप सरकारच्या निष्क्रियतेमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण वारंवार धोक्यात आले आहे.

ते पुढे म्हणाले की, सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केले नाही, ज्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. तसेच, ओबीसी मंत्रालय आणि महामंडळांची स्थापना करूनही पुरेसा निधी न दिल्याने समाजाची फसवणूक झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

यावेळी, राजपूरकर यांनी स्पष्ट केले की, ही मंडल यात्रा सामाजिक परिवर्तनासाठी आहे आणि ओबीसी समाजाच्या हक्कांसाठीचा हा संघर्ष शेवटपर्यंत सुरूच राहील.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button