IIT-बॉम्बेच्या नावावरील केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्यावरून राज ठाकरे टीकास्त्र — “सरकारची मानसिकता स्पष्ट होते”

मुंबई, 26 नोव्हेंबर 2025
IIT-Bombay चं नाव IIT-Mumbai न केल्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, हे वक्तव्य सरकारची मानसिकता स्पष्ट करणारे आहे.
काय झालं होतं?
सोमवार, 24 नोव्हेंबर रोजी IIT बॉम्बे येथील एका कार्यक्रमात बोलताना मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले होते—
“IIT-Bombay बाबत बोलायचं झालं तर देवाचे आभार की अजूनही हे नाव तसेच आहे. तुम्ही ते मुंबई केले नाहीत. हेच मद्राससाठीही लागू आहे. अजूनही IIT-Madras असंच आहे.”
या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले की,
“केंद्रीय मंत्र्यांचे हे विधान सरकारची विचारसरणी आणि नावांबाबतचा त्यांचा दृष्टिकोन दाखवते.”
राजकीय वर्तुळात या वक्तव्यावरून चर्चांना उधाण आले असून, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘बॉम्बे vs मुंबई’ या वादाची



