महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘सिटी न्यूज’ची विशेष मोहीम

शहरातील प्रत्येक प्रभागात जाणार ‘महासंग्राम’ रथ
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरी प्रश्नांना थेट वाचा फोडण्यासाठी सिटी न्यूजने विशेष ‘महासंग्राम’ ही जनसंवाद मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत सिटी न्यूजचा ‘महासंग्राम रथ’ शहरातील प्रत्येक प्रभागात दाखल होणार असून नागरिकांच्या समस्या थेट समोर आणल्या जाणार आहेत.
या मोहिमेचा मुख्य उद्देश नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांचा आढावा घेणे आणि लोकप्रतिनिधी तसेच उमेदवारांना त्यांच्या कामगिरीबाबत जाब विचारणे हा आहे. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, नागरिकांची सुरक्षितता यासह शहरातील विविध मूलभूत समस्यांवर सिटी न्यूजच्या माध्यमातून थेट प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत.
महासंग्राम मोहिमेद्वारे केवळ आश्वासनांवर नव्हे, तर प्रत्यक्ष कामांवर चर्चा होणार आहे. उमेदवारांनी केलेले दावे आणि दिलेली आश्वासने जमिनीवर कितपत उतरली आहेत, याची पडताळणी कॅमेऱ्यासमोर करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांचे प्रश्न ऐकून घेणे आणि ते संबंधित लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवणे, हा या मोहिमेचा महत्त्वाचा भाग आहे.
सिटी न्यूजचा महासंग्राम रथ गली–गली आणि प्रभाग–प्रभाग फिरत नागरिकांचा आवाज थेट प्रशासन आणि राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचवणार आहे. या माध्यमातून शहराच्या भवितव्याशी संबंधित मुद्द्यांवर व्यापक चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिटी न्यूजची ही विशेष मोहीम नागरिकांना जागरूक करण्यासोबतच लोकप्रतिनिधींना जबाबदार ठरवणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



