India NewsInternational NewsLatest NewsMaharashtra
इराणी युद्धनौकेवरील हल्ल्यानंतर ४५ खलाशांचे मृतदेह श्रीलंकेकडून इराणच्या दूतावासाकडे सुपूर्द

श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ इराणी युद्धनौकेवर झालेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या ४५ खलाशांचे मृतदेह श्रीलंका प्रशासनाने इराणच्या दूतावासाकडे सुपूर्द केले आहेत. ही प्रक्रिया शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी पूर्ण करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रकरणी गाले बंदर पोलिसांच्या विनंतीनंतर मुख्य दंडाधिकारी समीरा दोडंगोडा यांनी ११ मार्च रोजी करापिटिया राष्ट्रीय रुग्णालयाच्या संचालकांना मृतदेह सुपूर्द करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, या हल्ल्यातून बचावलेल्या ३२ खलाशांना उपचारानंतर रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना गालेजवळील कोग्गला येथील श्रीलंकेच्या हवाई तळावर हलविण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून या हल्ल्याबाबत पुढील चौकशी सुरू आहे.



