Accident NewsIndia NewsLatest News

बिहारमध्ये चंद्रग्रहणानंतर दुर्दैवी दुर्घटना: नदीत बुडून ६ चिमुकल्यांचा मृत्यू

बिहार राज्यातील बिहार मधील चंपारण जिल्हा येथे चंद्रग्रहणानंतर घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. ग्रहणाचे सूतक संपल्यानंतर नदीत स्नानासाठी गेलेल्या सहा निरागस मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही मुले राघवा नदी येथे आंघोळीसाठी गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने एक मुलगा खोल पाण्यात जाऊन बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी इतर पाच मुलांनी एकमेकांचे हात धरून मदतीचा प्रयत्न केला. मात्र नदीच्या पाण्याचा वेग जास्त असल्याने सर्वच मुले पाण्याच्या भोवऱ्यात अडकली आणि बुडाली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी नदीकाठी धाव घेतली. बचाव पथकाला पाचारण करण्यात आले; मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सर्व सहा मुलांचे मृतदेOGA बाहेर काढण्यात आले, परंतु एकालाही वाचवता आले नाही.

मृतांमध्ये दीक्षा कुमारी (१२), सोनाक्षी (९), प्रिया कुमारी (६), प्रिन्स कुमार (११), छोटी कुमारी (८) आणि सोनाली कुमारी (१२) यांचा समावेश आहे. मृतांमध्ये तीन बहिणी आणि दोन भाऊ असल्याने गावातील वातावरण अधिकच हळहळीत झाले आहे.

चंद्रग्रहणानंतर स्नान करण्याच्या प्रथेनुसार ही मुले नदीत गेली होती, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाची अधिकृत नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

होळीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडला आहे. गावात सर्वत्र शोक व्यक्त केला जात असून, प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी जाताना आवश्यक ती खबरद.Rad घेण्याचे आवाहन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button