Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsHelth CareLatest News

हिवाळ्यातील आजारांवर सतर्कता आवश्यक; आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन

हिवाळ्याच्या आगमनानंतर तापमान घटत असल्याने सर्दी, फ्लू, ब्रॉन्कायटिस आणि न्यूमोनिया यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळाव्यात, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

थंड हवेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि घरात जास्त वेळ राहण्यामुळे विषाणूजन्य आजारांचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता वाढते.

प्रमुख आजार आणि लक्षणे

सर्दी – श्वसनसंस्थेवर परिणाम करणारा विषाणूजन्य संसर्ग. खोकला, शिंका, नाक वाहणे आणि घसा बसणे ही सामान्य लक्षणे.
फ्लू (इन्फ्लुएन्झा) – अत्यंत संसर्गजन्य आजार; उच्च ताप, अंगदुखी, थकवा आणि छातीत कोंडल्यासारखे वाटणे अशी तीव्र लक्षणे.
नोरोव्हायरस (गॅस्ट्रोएन्टेरायटिस) – उलट्या, मळमळ, अतिसार आणि पोटातील मुरड अशी लक्षणे.
ब्रॉन्कायटिस – श्वसनमार्गातील दाह; दीर्घकालीन खोकला, हलका ताप आणि छातीत त्रास.
न्युमोनिया – फुफ्फुसांमध्ये सूज येणे; कफ, ताप, श्वास घेण्यास त्रास आणि छातीत दुखणे ही लक्षणे सामान्य.

प्रतिबंधात्मक उपाय सुचवले

आरोग्य विभागाने नागरिकांना पुढील प्रतिबंधात्मक उपाय पाळण्याचे आवाहन केले आहे –

  • हात नेहमी स्वच्छ धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर
  • आजारी व्यक्तींच्या संपर्कापासून सावध राहणे
  • संतुलित आहार, पुरेशी झोप आणि व्यायाम
  • खोकताना तोंड–नाक झाकणे
  • भरपूर पाणी घेऊन शरीर हायड्रेट ठेवणे
  • चेहऱ्याला हात लावण्याचे टाळणे
  • आजारी असल्यास घरीच राहून इतरांना संसर्गापासून बचाव करणे
  • परिसर आणि विशेषतः स्वयंपाकघरातील पृष्ठभाग निर्जंतुक ठेवणे
  • प्रदूषित धूर आणि तंबाखूच्या संपर्कापासून दूर राहणे

हिवाळ्यात स्वच्छतेच्या चांगल्या सवयी आणि आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारल्यास या आजारांपासून मोठ्या प्रमाणात बचाव होऊ शकतो. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेंद्र आसोले यांनी आवाहन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button