Latest News

संशोधनावर राष्ट्रीय आणि संस्थात्मक लक्ष केंद्रित करण्याची गरज – इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती

बेंगळुरू | १२ नोव्हेंबर २०२५

इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी भारतासाठी आणि जगासाठी उत्तम भविष्य घडवण्यासाठी संशोधनावर राष्ट्रीय आणि संस्थात्मक पातळीवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे सांगितले.

१२ नोव्हेंबर रोजी, ‘भारत आणि जगासाठी संशोधनाचे महत्त्व’ या विषयावर दिलेल्या व्याख्यानात, जे इन्फोसिस पुरस्काराच्या घोषणेच्या वेळी आयोजित करण्यात आले होते, श्री. मूर्ती म्हणाले,

“संशोधन म्हणजे मनाचा विस्तार — जो निसर्गातील रहस्ये उलगडतो, जे इतरांनी अद्याप पाहिले नाही ते दाखवतो आणि मानवजातीसमोरील समस्यांचे अशक्य वाटणारे उपाय शोधतो. आज आपल्या देशाला ज्या गोष्टीची सर्वाधिक गरज आहे, ती म्हणजे उत्तम भारत आणि उत्तम जगासाठी राष्ट्रीय आणि संस्थात्मक स्तरावर संशोधनावर लक्ष केंद्रित करणे.”

त्यांनी पुढे म्हटले की, “विज्ञान आणि संशोधन ही चैनीची साधने नसून, ती मानवाच्या अस्तित्वासाठी, सन्मानासाठी आणि प्रगतीसाठी अत्यावश्यक गरज आहेत.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button