बेकायदेशीर रेती उत्खननाने घेतले दोन तरुणांचे जीव

बुधवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास नागपूर शहरातील सुमारे दहा तरुणांचा गट भागीमाहेरी परिसरात पिकनिकसाठी आला होता.
या परिसरात मुरूम आणि वाळूच्या बेकायदेशीर उत्खननामुळे खोल खड्डे तयार झाले असून, पावसाच्या पाण्याने हे तलावासारखे दिसतात.
दरम्यान, सेल्फी घेण्याच्या उद्देशाने अविनाश आनंद हा बिहारचा रहिवासी आणि संकल्प मालवे हा चंद्रपूरचा रहिवासी तलावाच्या खोल भागात उतरले.
मात्र काही क्षणातच दोघेही पाण्याच्या खोल गर्तेत बुडाले. त्यांच्या मित्रांनी आरडाओरड करून मदत मागितली, पण तेव्हाच उशीर झाला होता.
घटनेची माहिती मिळताच पारशिवनी पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेशकुमार थोरात यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि गोताखोरांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. संकल्प मालवेचा मृतदेह सापडला असला तरी अविनाश आनंदचा शोध अद्याप सुरू आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला असून बेकायदेशीर उत्खननाविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे.
“प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशा घटना घडत आहेत,” असा आरोप नागरिकांनी केला आहे. तसंच मृत तरुणांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.



