Latest NewsMaharashtra

धनत्रयोदशीच्या दिवशी आदिवासी शेतकऱ्यांना 11 हजार रुपयांचा तोटा

मेळघाट परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी धनत्रयोदशीच्या दिवशी आपली मक्क्याची पिके बाजारात आणली. परंतु त्यांना हजार ते 1100 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला, जे शेतकऱ्यांच्या खर्चाच्या तुलनेत अगदी अल्प आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 49,460 रुपयांचा खर्च करूनही 11,000 रुपयांचा तोटा सहन करावा लागला. शेतकऱ्यांनी सांगितले, ‘एमएसपी प्रमाणे भाव मिळत नाही, त्यामुळे आमची दिवाळी काढी झाली. मुलाबाळांना दिवाळी कशी साजरी करावी हा प्रश्न निर्माण झाला.’ अनेक शेतकऱ्यांनी सोन्याचे दागिने गहाण ठेवून शेतीत पैसा गुंतवला होता, पण त्यांना मुद्दलही मिळाले नाही आणि व्याजही भरावे लागणार आहे. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांनी सरकारकडे आपले नुकसान भरून देण्याची मागणी करत उपोषणाची सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांचा हा उपोषण पुढील दिवसात सरकारकडे मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण करणार आहे, अशी अपेक्षा आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button