AmravatiLatest News
अमरावतीत वाहतूक कोलमडली; रेल्वे पूल बंदीमुळे रस्ते जाम

अमरावती शहरातील वाहतूक सध्या गंभीर कोलमडली आहे. राजकमल चौक, मालवीय चौक आणि इर्विन चौक यांसारख्या प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. हे सर्व रेल्वे पूल बंदीमुळे वळवलेल्या वाहतुकीमुळे झाले आहे.
वाहतूक नियंत्रणासाठी पुरेसे अधिकारी असूनही, वाहतूक व्यवस्था सुरळीत चालत नाही, ज्यामुळे नागरिकांना रोज अनेक तास रस्त्यावर अडकावे लागत आहेत.
पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने या समस्येवर तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. विशेषतः, पर्यायी मार्गांची योग्य व्यवस्था करून शहरातील वाहतूक सुरळीत केली जावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.



